भारताने केली ३९ पदकांची लयलूट

भारतीय बॉक्सर चमकले, अ‍ॅथलिटस्कडून निराशा
ग्लासगो : वृत्तसंस्था
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने शानदार प्रदर्शन करीत एकूण ३९ पदकांची लयलूट केली. या स्पर्धेत ख-या अर्थाने भारतीय बॉक्सरनी कमाल केली. भारतीय बॉक्सरनी एकूण १० पदके जिंकली असून, त्यापैकी ७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. अखेरच्या दिवशी आज भारतीय अ‍ॅथलिटस् काही तरी कमाल करतील आणि पदकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु भारतीय अ‍ॅथलिटस्नी निराशा केली.

राष्ट्रकुल स्पर्धेत आज अखेरच्या दिवशी भारतीय अ‍ॅथलिटस्ना देशासाठी काही तरी करून दाखविण्याची संधी होती. भारताच्या पदक तालिकेत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु भारतीय अ‍ॅथलिटस् या स्पर्धेत अपयशी ठरले. त्यामुळे भारताला ३९ पदकांच्या वर मजल मारता आली नाही. त्यामुळे या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत सर्वाधिक पदके जिंकणा-या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिला.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी ३९ पदके पटकावली.भारतापुढे आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा हे ३ देश आहेत. या यशात सर्वात मोठा वाटा भारतीय बॉक्सरचा आहे. कारण भारताचे १० बॉक्सर अंतिम फेरीत दाखल झाले आणि त्यातील ७ जणांनी सुवर्ण पदकाची कमाई केली तर ३ जणांनी रौप्य पदक जिंकत इतिहास घडविला.

२०१० मध्ये सर्वोत्तम कामगिरी
राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने सर्वाधिक पदके २०१० च्या स्पर्धेत जिंकली होती. ही स्पर्धा राजधानी दिल्लीत झाली होती. त्यावेळी भारतीय अ‍ॅथलिटस्नी घरच्या मैदानात १०१ पदकांची लयलूट केली होती. त्यामुळे ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदके जिंकली होती. भारताचे हे सर्वोत्तम प्रदर्शन राहिलेले आहे.

२०१४, १८ मध्येही बजावली उत्तम कामगिरी
२०१८ मध्ये गोल्ड कोस्टमध्ये आयोजित स्पर्धेतही भारताने ६६ पदके जिंकली होती. यात २६ सुवर्ण होती. याशिवाय २० रौप्य आणि २० कांस्य पदके पटकावली होती. तत्पूर्वी २०१४ मध्येही ग्लासगोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६४ पदकांची कमाई केली होती. त्यामध्ये १५ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्य पदके पटकावली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news