नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने, सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी आहे. देशाच्या निर्यातीत नोव्हेंबर महिन्यात मोठी वाढ झाली असून, आयातीत घट झाल्याने व्यापार तुटीवरचा दबाव काहीसा कमी झाला आहे. याचा थेट परिणाम शेअर बाजारातही पाहायला मिळणार आहे.
नोव्हेंबरमध्ये भारताची निर्यात १९.३७ टक्क्यांनी वाढून ३८.१३ अब्ज अमेरिकन डॉलर झाली. तर याच कालावधीत आयात १.८८ टक्क्यांनी घसरून ६२.६६ अब्ज अमेरिकन डॉलर झाली. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, नोव्हेंबरमधील ३८.१३ अब्ज डॉलर ही निर्यात गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक आहे. या वाढीमुळे ऑक्टोबरमधील नुकसानीची भरपाई झाली आहे. नोव्हेंबरमध्ये व्यापार तूट २४.५३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी नोंदवली गेली.
महागाईच्या आघाडीवर दिलासा : नोव्हेंबरमधील आकडेवारीतून संकेत मिळत आहेत की, महागाईचा सर्वात कठीण काळ आता मागे पडला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतींचा दबाव अजूनही असला तरी, त्यांच्या घसरणीचा वेग आता मंद झाला आहे. एकंदरीत, निर्यात वाढल्याने आणि महागाई आटोक्यात राहिल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही आकडेवारी सकारात्मक मानली जात आहे.

