Homeपरभणीमहाराष्ट्र गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील २५ कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

महाराष्ट्र गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील २५ कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

परभणी : येथील जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा दि.९ मे रोजी पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील २५ कर्तृत्ववान व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयात आयोजित पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एम.एम. शेख होते. यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, विशेष सत्कार मूर्ती महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध हिंदी कवी इम्रान राही (वर्धा), इंजि. आर.डी. मगर, अहमद चाऊस, हाजी शेख शेरू, खदिरलाला हाश्मी यांची उपस्थिती होती.

या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या २५ मान्यवरांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर व उपमहापौर यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने माजी मंत्री दुधगावकर, इमरान राही, इंजि. आर. डी. मगर यांची भाषणे झाली.

प्रास्ताविक जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. इब्राहिम बक्ष आझाद यांनी तर आभार इनामदार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शाईन जब्बार थारा, शेख शरीफ भाई, शफिक शेख, तब्बू पटेल, योगेश मुळी, तसलीम खतीब यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR