नांदेड : गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या प्रशासकासह महाराष्ट्र शासन आणी गुरुद्वारा बोर्डाला न्यायालयीन आदेशाची अवमानना केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. येथील न्यायाधीश संदीपकुमार मोरे वैशाली पाटिल यांच्या पीठापुढे १३ जुलै रोजी याबाबत सुनावनी झाली.
अवमाना संदर्भात खंडपीठात सरदार मनिंदरसिंघ इन्दरसिंघ (निजामाबाद), अमरजीतसिंघ खेमसिंघ सिलेदार यांच्यावतीने अॅड. जितेंद्र पाटील यांनी याचिका क्रमांक ३०३/२०२६ दाखल केली होती. त्याच्यावर सुनावनी सुरु असून छ. संभाजीनगर उच्च न्यायालयात येत्या २४ जुलै रोजी गुरुद्वारा बोर्ड बहाल करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुद्वारा बोर्डाचे पूर्व सदस्य सरदार परमज्योत सिंघ चाहल आणि सरदार रविन्द्रसिंघ बुंगाई यांनी खंडपीठात स्व. भूपिंदरसिंघ मिनहास अध्यक्ष असतांनाचा पूर्वीचा बोर्ड बहाल करावा अशी याचिका (१०५५३/२०२२) दाखल केली होती.
ज्यावेळी बोर्ड बरखास्त करण्यात आले तेव्हापासून निवडणुका होईपर्यंत मागील बोर्डाला कार्यकाळ मिळावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. तर गुरुद्वारा सचखंड बोर्ड बहाल करण्याविषयी सरदार मंजीतसिंघ जगनसिंघ यांनी देखील याचिका क्रमांक ४६६५/२०२४ दाखल केलेली होती. वरील याचिकेत आता अवमानना याचिका क्रमांक १४६/२०२६ व याचिका क्रमांक ३०३/२०२६ एकत्र करुन दि. २४ जुलै २०२६ रोजी न्यायलयाने पुढील सुनावणी साठी तारीख दिलेली आहे.
















