नवी दिल्ली : सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन करावे लागले होते. दरम्यान कोरोनाच्या विषाणूंमुळे नर उंदरांच्या शुक्राणूंमध्ये बदल होत असल्याची आणि त्यामुळे त्यांच्या पुढील अपत्यांमध्ये चिंता वाढल्याची माहिती नव्या अध्ययनामधून समोर आली आहे. ही बाब कोरोनामुळे निर्माण झालेली दीर्घकाळापर्यंत चालणारी समस्या असू शकते. तसेच त्याचा पुढील पिढ्यांवर परिणाम होऊ शकतो.
सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन करावे लागले होते. दरम्यान कोरोनाच्या विषाणूंमुळे नर उंदरांच्या शुक्राणूंमध्ये बदल होत असल्याची आणि त्यामुळे त्यांच्या पुढील अपत्यांमध्ये चिंता वाढल्याची माहिती नव्या अध्ययनामधून समोर आली आहे. ही बाब कोरोनामुळे निर्माण झालेली दीर्घकाळापर्यंत चालणारी समस्या असू शकते. तसेच त्याचा पुढील पिढ्यांवर परिणाम होऊ शकतो.
ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे फ्लोरी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्स अँड मेंटल हेल्थच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. ही माहिती १२ ऑक्टोबर रोजी नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेल्या नरापासून जन्माला आलेल्या सर्व अपत्यांवर परिणाम झालेला दिसल. विशेषकरून मादी मुलांच्या मेंदूतील हिप्पोकेंपस भागातील काही जीनचं वर्तन बदललेलं दिसले. याबाबत कॅरोलिना गुबर्ट या शास्रज्ञाने सांगितले की, हा बदल एपिजेनेटिक इनहेरिटेंस आणि मेंदूच्या विकासात झालेल्या गडबडीमुळे होऊ शकतो. त्यामुळे चिंता करण्याचे प्रमाण वाढते.
कोविडच्या संसर्गाचा अपत्यावर दीर्घकाळासाठी होणारा परिणाम दर्शवणारे हे पहिलेचअध्ययन आहे. या विषाणूने नराच्या शुक्राणूंमधील आरएनएमध्ये बदल घडवून आणला. हा आरएनए मेंदूचा विकास करणा-या जिनवर नियंत्रण ठेवतो. इन्स्टिट्यूटमधील प्रमुख संशोधक अँथोनी हेनन यांनी सांगितले की, या संशोधनामधून कोविड १९ च्या साथीचा परिणाम येणा-या पिढ्यांवर पडू शकतो असे दिसून येत आहे.
मात्र सध्यातरी हे संशोधन उंदरांवर करण्यात आले आहे. मात्र मनुष्यांवर संशोधन होणे बाकी आहे. जर हे संशोधन माणसांवर करण्यात आले तर जगभरातील लाखो मुले आणि त्यांचे कुटुंबीय प्रभावित होतील, हा सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका आहे असे हेनन यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा फैलावर २०२० च्या सुरुवातीला झाला होता. तसेच या विषाणूमुळे जगभरात सुमारे ७० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत, असे सांगितले जाते. एवढेच नाही तर या साथीने मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम घडवून आणले होते.

