‘एआय’वर कोणतेही नियमन नाही; नवोन्मेषावरच भर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या केंद्र सरकारची प्राथमिकता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नवोन्मेष (इनोव्हेशन) वाढवण्यावर आहे, नियमन किंवा नवीन कायदा आणण्यावर नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी या संदर्भातील माहिती दिली.

आयटी सचिवांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोणतेही नियमन नाही, तर इनोव्हेशन ही आमची प्राथमिकता आहे. एआयमध्ये नवोन्मेषासाठी मोठा वाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवीन कायद्याची गरज तेव्हाच भासेल जेव्हा त्याची खरोखर आवश्यकता वाटेल. गरज पडल्यास सरकार नियमनासाठी मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया एआय गव्हर्नन्स गाईडलाईन्स’ अहवाल सरकारच्या धोरणाचे समर्थन करतो. एआय नियंत्रित करण्यासाठी सरकारने विश्वासार्हता, लोक-केंद्रित दृष्टिकोन, नियंत्रणाऐवजी नवोन्मेष, निष्पक्षता, जबाबदारी, सुरक्षितता आणि स्पष्ट खुलासा यासारख्या सात तत्त्वांचे पालन करावे, अशा शिफारसी या अहवालात आहेत.

वेळेनुसार नवीन कायदे : आयआयटी मद्रासचे प्रा. बी. रविंद्रन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एआय सुरक्षेसाठी अनेक अल्प-मुदतीचे उपाय सुचवले आहेत. प्रशासकीय संस्था (गव्हर्नन्स इन्स्टिट्यूशन्स) स्थापन करणे, भारत-विशिष्ट एआय फ्रेमवर्क तयार करणे, कायद्यात बदल सुचवणे आणि पायाभूत सुविधा वाढवणे. सामायिक मानके प्रकाशित करणे, कायदे आणि नियमनामध्ये बदल करणे, एआय घटना प्रणाली सुरू करणे आणि रेग्युलेटरी सँडबॉक्सेसची चाचणी (पायलट) करणे. सरकारला क्षमता वाढवणे, मानके ठरवणे आणि वेळेनुसार नवीन कायदे तयार करत राहण्याचेही आवाहन पॅनेलने केले आहे. प्रिन्सिपल सायंटिफिक अ‍ॅडव्हायझर अजय सूद यांनी सर्व मंत्रालये आणि उद्योगांनी एआयमधील नवोन्मेष आणि सुरक्षितता यावर एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. ही सर्व शिफारस सार्वजनिक विचारविनिमय आणि प्राप्त झालेल्या ६५० टिप्पण्या तपासल्यानंतर आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news