अखेर सीना नदीत पाणी; भीमा-सीना जोड कालव्यातून सोडलेल्या पाण्याने सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

रिधोरे (अतुल गवळी) : तब्बल पावणे दोन महिने पावसाने पाठ फिरवल्यानंतर अखेर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून सोडलेले पाणी अखेर सीना नदीत दाखल झाले असून, रविवारी दुपारी हा प्रवाह रिधोरे येथील बंधाऱ्यापर्यंत पोहोचला. नदीत पाण्याचा प्रवाह दिसताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या हंगामात संपूर्ण जून महिना जवळपास कोरडाच गेला. जुलै महिनाही संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी ऊस, केळी, डाळिंब, मका, तूर, कांदा तसेच इतर नगदी आणि फळबाग पिकांवर पाण्याअभावी गंभीर संकट ओढवले होते. अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकरी चिंतेत होते.

शेतकऱ्यांच्या मागणीला यश
जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई आणि शेतीसमोरील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत १४ जुलै रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली होती. या बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतीसाठी पाण्याची निकड याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १६ जुलैपासून उजनी धरणाच्या मुख्य डाव्या व उजव्या कालव्यांसह भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या निर्णयाचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसून येत असून, कालव्यातील पाणी सीना नदीपर्यंत पोहोचले आहे.

नदीला मिळाले नवजीवन
रिधोरे येथील बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचताच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. नदीत आलेल्या या प्रवाहामुळे विहिरी, बंधारे आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढून पिकांना मोठा आधार मिळणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी महापूर, यंदा दुष्काळ
विशेष म्हणजे, गतवर्षी याच सीना नदीला महापूर आला होता. त्या वेळी तूर, सोयाबीन, कांदा, मका, ऊस आणि कापूस यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट असून, पावसाअभावी नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. अशा वेळी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांसाठी मोठे ‘जीवदान’ ठरत आहे.

लाखो एकर शेतीला मिळणार दिलासा
सीना नदीत दाखल झालेल्या या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील लाखो एकर शेतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास करपू लागलेली पिके सावरण्यास मदत होईल, तसेच खरीप हंगामातील नुकसान काही प्रमाणात टळू शकते. दरम्यान, कालव्यातून पाणी सोडल्याने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे लक्ष अजूनही आकाशाकडे लागले आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास शेतीला नवे बळ मिळेल आणि दुष्काळसदृश परिस्थितीतून जिल्ह्याची सुटका होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news