40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रआता माघार मविआने घ्यावी!

आता माघार मविआने घ्यावी!

बंडखोरी करत सांगलीत विशाल पाटलांचे आव्हान

सांगली : सांगलीमध्ये महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले. यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्यासाठी अर्ज भरला. यावेळी सांगलीत विशाल पाटील यांनी भाषण सुरू केले. भाषणादरम्यान त्यांनी महाविकास आघाडी तसेच संजय राऊत यांच्यावर टीका केली.
संजय राऊत सांगलीत आले. बोलून गेले. पण सांगलीत ही भाषा शोभणारी नाही. राजकारण करायचे तर संयमाने करा, असे आव्हान यावेळी विशाल पाटील यांनी दिले. आज पाहिली बैठक आहे.

पुढे अजून फड रंगणार आहे. हे बंड काँग्रेसचे आहे. काँग्रेसचे चिन्ह नेऊ पाहत आहे. आता माघार महाविकास आघाडीने घ्यावी. १९ तारखेला आमच्या उमेदवारीला एबी फॉर्म जोडावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत. जिल्ह्यातील बाळासाहेब आणि त्यांचे कार्यकर्तेदेखील ताकदीने पाठिंबा देत आहेत. हा लढा काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसमधले हे बंड आहे. जेव्हा जेव्हा वसंतदादा पाटील घराणे अडचणीत असते, त्यावेळी अंजनी पुत्र पाठिशी असतात असे ते म्हणाले.

काल आर. आर. आबांच्या समाधीचे दर्शन घेतले. वैराग्य आमचे घर संपवायला लागेल म्हणून जयश्रीताई पाटील माझ्या रॅलीत सर्वांत पुढे राहिल्या. काँग्रेसमध्ये बंड करणे आम्हाला देखील योग्य वाटत नाही.. ज्या ज्या वेळी मला काँग्रेसने थांब म्हटले मी थांबलो. मी स्वार्थासाठी लढत नाही असे त्यांनी सांगितले.
२००५ साली वडील वारल्यानंतर मला उमेदवारी मिळाली नाही, पण मी थांबलो. आजपर्यंत थांबलोय. मी पक्षावर एकतर्फी प्रेम केले. वसंतदादा आणि काँगेसबद्दल बोलताना विशाल पाटील भावूक झालेले दिसले. लोकांनी आम्हाला सांभाळून घेतले. यावेळी पुन्हा राजकारण आडवे आले. ज्यावेळी राजारामबापू वारले, त्यावेळी वाद संपला आहे, दादा-बापू वाद संपला आहे. येताना मी राजारामबापू यांचे दर्शन घेऊन आलो आहे.
चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढणार
सांगलीत विशाल पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. विशाल पाटलांच्या रॅलीत मोठा जनसमूह लोटल्याचं दिसतंय. मविआतला सांगलीचा वाद चिघळलाय. १० तारखेला ३ वाजेपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटलांनी व्यक्त केली आहे. विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्यास चंद्रहार पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

विशाल पाटलांची मनधरणी करू
तर विशाल पाटलांची मनधरणी करू असा सूर मविआच्या नेत्यांनी लावला आहे. सांगलीची जागा काँग्रेसची नैसर्गिक जागा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे. मात्र विशाल पाटील चुकीचं पाऊल उचलणार नाहीत याची काळजी घेऊ.. अशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी घेतली आहे. तर वसंतदादा पाटलांनी कधीच काँग्रेसशी बेइमानी केली नाही..ती परंपरा सोडून विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR