39.8 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeधाराशिवबहिणीला पळवून नेल्याच्या कारणावरून एकाचा खून

बहिणीला पळवून नेल्याच्या कारणावरून एकाचा खून

धाराशिव : प्रतिनिधी
१० वर्षापुर्वी बहिणीला पळवून नेल्याच्या कारणावरून परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील एका ३५ वर्षीय तरूणाचा खून करण्यात आला. ही घटना ढगपिंपरी येथे ३० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाणे येथे ३१ ऑक्टोबर रोजी आरोपी सोन्या भगवान चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील विठ्ठल भाऊ मदने (वय ३५) याने गावातीलच सोन्या भगवान चौधरी यांच्या बहिणीला १० वर्षापुर्वी पळवून नेले होते. याचा राग मनात धरून सोन्या चौधरी याने विठ्ठल मदने यांचा खून केला. दि. ३० ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ढगपिंपरी येथील कांबळे यांच्या घराजवळ सोन्या चौधरी याने विठ्ठल माने यांना कुह्राडीने मारहान करुन खून केला. या प्रकरणी मयताचा भाऊ अनंता भाऊ मदने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पोलीस ठाणे येथे कलम ३०२ भा. दं. वि. सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR