Homeराष्ट्रीयआसाममधील २.४३ लाख मतदारांची नावे वगळली

आसाममधील २.४३ लाख मतदारांची नावे वगळली

बिस्वांविरोधात याचिका

गुवाहाटी : निवडणूक प्रक्रियेतून जात असलेल्या आसाममध्ये मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या एका अधिका-याने सांगितले की, मसुदा मतदार यादीतून २.४३ लाखांहून अधिक नावे वगळण्यात आली आहेत. दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एकूण २.४९ कोटी मतदारांसह अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, जी मसुदा यादीच्या तुलनेत ०.९७% घट दर्शवते. आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

उल्लेखनीय आहे की, २७ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले होते- ‘आसाममध्ये एसआर दरम्यान ४-५ लाख ‘मिया’ मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली जातील. माझे काम मिया लोकांना त्रास देणे आहे आणि भाजप मियांच्या विरोधात आहे.’ या विधानावर कडक कारवाईची मागणी करत अनेक विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या याचिकांवर सुनावणी घेण्यास मंजुरी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR