32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयमुंबई-पुणेकरांचा प्रवास होणार जलद!

मुंबई-पुणेकरांचा प्रवास होणार जलद!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. देशाची आर्थिक राजधानी देशासह राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यात येणार आहे. वंदे भारतमुळे प्रवास अतिशय जलद होत आहे. प्रवाशांना आवश्यक त्या सुख-सुविधांसह या ट्रेनने प्रवास होत आहे. देशात आणखी १० वंदे भारत एक्स्प्रेस सेवेत सादर होणार आहेत. त्यात मुंबई-पुणेसाठी वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. या ट्रेनमुळे मुंबईकर आणि पुणेकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे.

गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा विकास झपाट्याने झाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही एकमेव सेमी हायस्पीड ट्रेन आहे, जी प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. भारताचे रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातील काही मार्गांवर धावते. सध्या देशात ८२ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. वर्षभरात यात आणखी वाढ होणार आहे. याचदरम्यान राज्यात मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहेत. आता देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. या दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सुरू होणार असून १२ मार्चला राज्याला या दोन गाड्या मिळणार आहेत. त्यामुळे राज्यात विशेषत: मुंबई-पुणे मार्ग अधिक सुखकारक होण्यास मदत होणार आहे.

पुणे शहरात दुसरी नवीन वंदे भारत रेल्वे सुरू होत आहे. नव्या रेल्वे गाड्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पुणे-बडोदा आणि पुणे-सिकंदराबाद या दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहेत. १२ मार्च रोजी पुण्यासह देशाला नवीन १० वंदे भारत रेल्वे एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

महाराष्ट्रात एकूण ६ वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. आता ही संख्या वाढून ८ इतकी होणार आहे. सध्या वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर, सीएमटी ते शासकीय मडगाव, सीएमटी ते शिर्डी आणि सीएमटी ते सोलापूर या मार्गासह सीएमटी ते जालना या मार्गावर धावते. तसेच वंदे भारत एक्स्प्रेस मध्य प्रदेशातील बिलासपूर ते नागपूर दरम्यान धावते. पुढील काळात आणखी वंदे भारत गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा आरामदायी प्रवास होण्यास मदत होणार आहे.

आणखी दोन गाड्या मिळण्याची शक्यता
महाराष्ट्रातून शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. आता पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन वंदे भारत एक्स्प्रेस येत आहेत. सध्या रेल्वे मंत्रालय मे २०२४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणा-या ३० ते ३५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. यामध्ये गजानन महाराजांच्या श्रीक्षेत्र शेगावचाही समावेश आहे. दरम्यान, जळगाव आणि भुसावळ हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन पॉइंट आहेत. येथे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वंद भारत ट्रेनला किंवा दोन्ही स्थानकांवर थांबा मिळण्याची ही शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR