38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeक्रीडाइंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

नवी दिल्ली : १० डिसेंबरपासून सुरू होणा-या दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी पुरुष क्रिकेट भारतीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासोबतच्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे.

निवडकर्त्यांनी अवघ्या २४ तासांच्या कालावधीत ३ परदेशी संघांचा सामना करण्यासाठी भारतीय संघाची निवड केली. ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी संघाची निवड झाल्यानंतर, १ डिसेंबर रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या जाणा-या टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी मालिकेसाठी भारताच्या १६ सदस्यीय संघाचीही घोषणा करण्यात आली.

भारतीय महिला क्रिकेट संघाला ६ ते १० डिसेंबर दरम्यान इंग्लंडसोबत ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. १४ डिसेंबरपासून एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडनंतर भारताला ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासोबत कसोटी खेळायची आहे, जी २१ डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR