जालना : कोट्यवधी मराठे पुन्हा एकदा एकवटणार आहेत. ९०० एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होईल अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी ही विराट सभा घेणार असल्याचे जरांगेंनी जाहीर केले.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ६ कोटी मराठा शांततेत एकत्र येणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही.. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी ही विराट सभा होईल, असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे.
मनोज जरांगेंच्या घोषणेनंतर विराट सभेसाठी मैदानाची पाहणी सुरू झाली आहे. फडणवीसांची दडपशाही, दहशत आणि गुंडगिरी ही सत्तेच्या जोरावर चालली आहे. मैदान भेटल्यावर मी पुढची सर्व माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.
आम्हाला शांत एकत्र येऊन यांचं सगळं बिघडवावं लागणार आहे. आम्ही ७०० एकर जागा पाहिली पण ती आम्हाला कमी पडते. ६ कोटी मराठे एकत्र येणार आहेत. आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे. यांचं सगळं बिघडवावं लागणार असल्याचे जरांगे यावेळी म्हणाले.