32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाविराटला टी-२० साठी टीम इंडियात स्थान नाही!

विराटला टी-२० साठी टीम इंडियात स्थान नाही!

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जूनमध्ये होणा-या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत विराट कोहलीला भारतीय संघात स्थान मिळणार नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार येत्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला होता. या स्पर्धेत अनेकदा भारतीय संघ अडचणीत असताना त्याने महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं जात आहे की, बीसीसीआयच्या मते वेस्टइंडिजची स्लो खेळपट्टी विराटसाठी फलंदाजी करण्यासाठी अनुकूल नसेल. तसेच या वृत्तात असा देखील खुलासा करण्यात आला आहे की, युवा खेळाडूंना मार्ग करून देण्यासाठी विराटची समजूत काढण्याची जबाबदारी ही मुख्य निवडकर्ता अजित आगरकरकडे सोपवण्यात आली आहे.

नुकतीच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मोठा खुलासा करत म्हटले होते की, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार. यासह त्यांनी असेही म्हटले होते की, याबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR