35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeआरोग्यवैद्यकीय महाविद्यालयाच्या रुपांतरासाठी समिती स्थापणार

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुपांतरासाठी समिती स्थापणार

जिल्हा रुग्णालयाचे रुपांतर वैद्यकीय महाविद्यालयात होणार महाविद्यालयांची संख्या वाढणार

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. अंतरिम अर्थसंकल्पात देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली आहे. जिल्हा रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयात केले जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणार आहे.

जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे. ही समिती सध्याच्या जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याबाबत सूचना देणार आहे. यासोबतच अर्थमत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, सरकार मिशन सर्व्हायकल कॅन्सर लसीकरणाला प्रोत्साहन देईल. यामध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे.

आयुष्मान भारत योजना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी घोषणा केली आहे. सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचाही आयुष्मान भारत योजनेत समावेश केला जाईल, अशी घोषणा अर्थमंर्त्यांनी केली. आतापर्यंत आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचा आयुष्मान भारत योजनेत समावेश नव्हता. आता त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान भारत योजना किंवा आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही देशातील सर्वात मोठी पेपरलेस आरोग्य सेवा योजना आहे.

खासगी रुग्णालयातही आर्थिक मदत मिळणार
हे कॅशलेस वैद्यकीय संरक्षण प्रदान करते. भारत सरकारद्वारे प्रायोजित ही योजना सार्वजनिक रुग्णालये आणि नेटवर्क खासगी रुग्णालयांमध्ये वंचित कुटुंबांना कुटुंबाचा आकार, लिंग आणि वय यांच्याशी संबंधित कोणत्याही मर्यादांशिवाय आर्थिक मदत पुरवते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR