36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडनागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क रहावे

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क रहावे

जिल्हाधिका-यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी ६:०९ व ६:१९ मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे ४.५ व ३.६ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.

नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR