लातुर प्रतिनिधी :
लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील कन्या व सध्या पुणे येथील अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये शिक्षण घेत असलेली भाग्यश्री सूर्यकांत सुडे हिचा मृत्यु झाला होता त्याबद्दल सूर्यकांत सुडे कुटुंबाची विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. १५ एप्रिल रोजी हरंगुळ येथील निवासस्थानी जाऊन सुडे कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला.
यावेळी चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी झालेली घटना दुर्दैवी असून
या बाबत दुःख व्यक्त केले. यावेळी सूर्यकांत सुडे, डॉ. सारीका देशमुख, संगीता मोळवणे, सोनाली थोरमोटे व सुडे कुटुंबीय आदी उपस्थित होते.