सतीश टोणगे
कळंब :
मराठा आरक्षणामुळे सध्या सत्ताधारी मंडळीवर मराठा समाज नाराज आहे. सगेसोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी असतानाही त्याला बगल दिली आहे. यासाठी सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आजही उभा असून राजकारणामध्ये ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना मतदान करू नका, त्यांना पाडा. पाडण्यातही आपला विजय असतो अशी चर्चा सध्या मराठा समाजात होऊ लागल्याने नेमकी या समाजाची भूमिका काय राहणार, कोणत्या उमेदवाराला तारणार व कोणत्या उमेदवाराला मारणार याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. मराठा समाजाचा धाराशिव जिल्ह्यासह बीड, संभाजीनगर, बीड, सोलापूरवर प्रभाव पडणार आहे.
परंतु काहीही झाले तरी मराठा आरक्षणाचा परिणाम मात्र भाजपाच्या व मराठा आरक्षणाविरोधात बोलणा-या उमेदवारांना भोगावाच लागणार असल्याची कुजबूज होऊ लागली आहे.
या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा कोणत्याच राजकीय पक्षाला पाठिंबा नसल्याचे, मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील जाहीर करत आहेत.
मी राजकारणात नसल्याने मी कोणाला पाडा किंवा कोणाला पाडू नका असे सांगितले नसल्याचेही त्यांनी जाहीर केले असले तरी समाजाला त्रास दिलेली आठवण न विसरता त्यांना पाडा…असा आदेश दिल्याचे समजते.
समाजाची ताकद दिसली पाहिजे, आपल्या महिला, तरुणांना मारहाण केली हे विसरू नका,…सावध राहा, हीच वेळ आहे धडा शिकवायची, असा मेसेज सोशल मीडियावर फिरू लागला असून, यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. मराठा आरक्षणाचा प्रभाव