30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा?

सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा?

सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेंचा सवाल

जालना : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३२ जण उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर, इतर समाजावर अन्याय न होता मराठ्यांना आरक्षण मिळावे असे आमचे याबाबत सर्वांचे एकमत झाले असून मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युध्दपातळीवर काम करत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजाने संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीनंतर बोलताना म्हणाले.

याबद्दल विचारले असता मनोज जरांगे यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. जरांगे म्हणाले की, सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे? तसेच सरसकट महाराष्ट्राला आरक्षण लगेच देणार का? समाजाला विचारून बघू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

बैठकीत काय झालं याचा तपशील मिळाला नाही, गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष न देता सरकार नुसत्या बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडत आहेत, तरी लक्ष देत नाहीत. हसण्यावारी नेत आहेत. हे जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं काय. गोरगरिबांच्या लेकरावर गुन्हे दाखल केले जात आहेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR