35.6 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारच्या प्रामाणिकपणावर जरांगे-पाटलांनी विश्वास ठेवावा

सरकारच्या प्रामाणिकपणावर जरांगे-पाटलांनी विश्वास ठेवावा

मुंबई : सरकार दोन पातळ्यांवर काम करत आहे. त्यासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे सरकारच्या प्रामाणिकपणावर जरांगे-पाटलांनी विश्वास ठेवावा असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मांडले.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. जरांगे-पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यावर सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. बैठकीतील मुद्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागासवर्ग आयोग युद्धपातळीवर काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयात रद्द झालेल्या आरक्षणातील त्रुटींबद्दलची पूर्तता करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठा समाजाला न्याय देणारा निर्णय लागेल, अशी खात्री सरकारला आणि सर्वपक्षीय नेत्यांना आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘सरकारला थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे-पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आरक्षण मिळवण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करण्यास तयार आहे. जरांगे-पाटलांनी आपले उपोषण मागे घ्यावे, असा ठराव सर्व नेत्यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR