33.1 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटामुळे राणीने लग्नाचा घेतला निर्णय

‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटामुळे राणीने लग्नाचा घेतला निर्णय

मुंबई : करण जोहरच्या २००६ च्या रोमँटिक ड्रामा ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटामध्ये राणी मुखर्जीची सर्वांत चमकदार भूमिका होती. या चित्रपटात तिने माया नावाच्या दु:खी पत्नीची भूमिका साकारली होती, जी विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडते, त्यामुळे तिचा घटस्फोट होतो. मात्र, आता एका मुलाखतीत राणीने हा चित्रपट तिच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. यामुळे तिला ख-या आर्थाने लग्न करण्यासही मदत झाली, असे सांगितले.

राणीने म्हणाली की, अशा अनेक महिला आहेत ज्या दीर्घकाळ आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल उघडपणे बोलत नाहीत. अनेक वर्षे निघून जातात आणि ती म्हातारी होते, तरी देखील तिला स्वत:शी प्रामाणिक राहता येत नाही. ज्या वेळी मी एक तरुण मुलगी म्हणून ‘कभी अलविदा ना कहना’ केली होती, त्या वेळी मला माझ्या लग्नाचा निर्णय घेण्यात मदत झाली. योग्य कारणासाठी लग्न करणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या कारणासाठी लग्न केले तर तुम्ही अशा व्यक्तीसोबत राहाल त्याचा तुम्हाला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल, असे राणी म्हणाली.

‘कभी अलविदा ना कहना’मध्ये अभिनेता शाहरूख खान, अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा, अमिताभ बच्चन आणि किरण खेर यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने त्याची निर्मिती केली होती आणि या चित्रपटाची कथाही त्यानेच लिहिली होती. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, मात्र एक विवाहित महिला दुस-या एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडते, या कारणामुळे देशात या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR