जिंतूर : तालुक्यातील आडगाव (बा) येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय जि.प. मुख्याध्यापक भाग्यवंत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ज्ञान मंदिरचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील तसेच संस्थाध्यक्ष सय्यद हकीम होते. मुख्याध्यापक जाधव, खरात, सिराज, जिंतूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्था अध्यक्ष सय्यद हकीम यांनी शाळा सदैव तुमच्या सोबत आहे असा विद्यार्थ्यांना दिलासा देऊन मेहनत करा.
देशहित लक्षात घेऊन जीवन जगा. आपल्या आईवडिलांची शरमेने मान झुकणार नाही असे आपल्या जीवनात वागा असा संदेश दिला. अध्यक्षीय समारोपात भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांना म्आई-वडील यांची सेवा करा. सदैव प्रयत्न करा यश हमखास मिळेल. परीक्षेस न घाबरता शांत मनाने सामोरे जाण्याबद्दल संदेश दिला. शाळेतील सर्व सहशिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवणाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सूत्रसंचालन क-हाळे यांनी तर प्रदीप खंडागळे यांनी आभार मानले.