लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकाभिमुख नेतृत्व, ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडून जनसामान्यांना केंद्रस्थानी ठेवणारे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची दि. २६ मे रोजी ८१ वी जयंती अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. राजकारण, प्रशासन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा समतोल साधत प्रगतीला नवी दिशा देणा-या या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बाभळगाव येथील विलासबागेतील स्मृतीस्थळी कुटुंबीय, नातेवाईक आणि लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो स्नेही मंडळींच्या उपस्थितीत भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
मंगळवारी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे ‘भावस्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला आदरांजली वाहिली.
प्रारंभी, सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखाना चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा देशमुख, विनायकराव पाटील, उल्हासदादा पवार, जयसिंह
देशमुख, अभिजित देशमुख आणि डॉ. सारिका देशमुख, वंश, दिवियाना यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली.
पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्य परिवारातील ज्येष्ठ शिष्य सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक हेमंत पेंडसे व त्यांचे सहकारी यांनी शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून ‘भावस्वरांजली’ सादर केली यातून आदरांजली सभेला भावपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. या वेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे यांच्यासह लातूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने आलेल्या स्नेही मंडळींनी लोकनेत्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
या वेळी अशोकराव पाटील निलंगेकर, आबासाहेब पाटील, अॅड. व्यंकट बेद्रे, जगदीश बावणे, अभय साळुंके, विजय देशमुख, व्ही. पी. पाटील, दिलीप पाटील नागराळकर, ललीतभाई शहा, श्रीशैल उटगे,
प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, अॅड. किरण जाधव, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, अशोक काळे, प्रवीण पाटील, अॅड. दीपक सूळ, बी. व्ही. मोतीपवळे, दिलीप माने, डॉ. हणमंत किणीकर, डॉ. बी. आर. पाटील, यशवंत पाटील, सर्जेराव मोरे, रवींद्र काळे, गोविंद बोराडे, सुनील पडिले, कल्याण पाटील, आत्माराम पवार, एस. डी. बोखारे, आर. बी. माने, जितेद्र देहाडे, डॉ. लक्ष्मण देशमुख, प्राचार्य बाबासाहेब गोरे, प्राचार्य अजय पाटील, गणपतराव बाजुळगे, संतोष सोमवंशी, रवींद्र काळे, अॅड. समद पटेल, संतोष देशमुख, सचिन बंडापल्ले, कैलास पाटील, मदन भिसे, बंकट भिसे, रणजीत पाटील, अमृत जाधव, सुभाष माने, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, व्यंकटेश पुरी, अनिल पाटील, सतीश पाटील, व्ही. के. आचार्य, दगडूअप्पा मिटकरी, विद्या पाटील, सुनीता अरळीकर, सपना किसवे, स्वयंप्रभा पाटील, प्रिती भोसले, स्वाती पवार, संगीता मोळवणे, मीना सूर्यवंशी, केशरबाई महापूरे, ख्वॉजाबानू अन्सारी, उषा चव्हाण, उपसरपंच गोविंद देशमुख, लक्ष्मी भोसले, दगडूसाहेब पडिले, रामानुज रांदड, प्रा. गोविंद घार, श्याम भोसले, जे. जी. सगरे, प्रा. डी. एन. केंद्रे, प्रकाश कासट, कृष्णकुमार बागड, प्रवीण सूर्यवंशी, सूर्यकांत कातळे, प्रवीण कांबळे, पाडुरंग वीर, जितेंद्र स्वामी, डॉ. बालाजी साळुंके, बालाजी वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, गुरूनाथ गवळी, लक्ष्मण मोरे, जयचंद भिसे, फैसल कायमखानी, श्रीनिवास शेळके, संभाजी रेड्डी, चंद्रकांत चिकटे, धीरज पाटील, प्रशांत पाटील, बबन देशमुख, अॅड. देविदास बोरूळे पाटील, तुकाराम आडे, राजकुमार जाधव, पृथ्वीराज शिरसाठ, अशोक गोविंदपूरकर, बसवंतआप्पा बरडे, डॉ. एस. एन. जटाळ, इसरार सगरे, अमर मोरे, दीपक पटाडे, राजेद्र मस्के, निलेश फेरे, अतिश चिकटे, विकास कांबळे, गिरीश ब्याळे, विष्णू धायगुडे, अभिषेक पतंगे, नारायण ढोरमारे, गोटू यादव, संजय निलेगावकर, सोनू डगवाले, रमेशसिंह बिसेन, डॉ. अरविंद भातांब्रे, राजकुमार पाटील, राजेद्र काळे, कलीम तांबोळी, युवराज जाधव, बसवराज धरणे, सुरेश धानुरे, अमित पांडे, प्रदिप गगणे, बादल शेख, फारुख शेख, भैरवनाथ सूर्यवंशी, उमाकांत जाधव, अविनाश बट्टेवार, सतीश हलवाई, लक्ष्मीकांत मंठाळे, संजय पाटील खंडापूरकर, अॅड. विजय गायकवाड, सुनील बसपुरे, विकास वाघमारे, जयदेव मोहिते,
श्रीशैल गडगडे, राम स्वामी, डॉ. दिनेश नवगिरे, पुनित पाटील, बालाजी वाघमारे, मारूती पांडे, सुपर्ण जगताप, नंदकिशोर पापा मोदी,
पवन देशमुख, धोंडिराम यादव, मुक्ताराम पिटले, गोविंद देशमुख, विजयकुमार साबदे, रामदास पवार, एकनाथ पाटील, गोविंद केंद्रे, विजयकुमार धुमाळ, माधव गंभीरे, आनंद वैरागे, पवन गायकवाड, चक्रधर शेळके, अभिजित इगे, गणेश देशमुख, नरसिंह बुलबुले, मनोज पाटील, बळवंत पाटील, प्रदीप राठोड, अॅड. शरद देशमुख, तात्यासाहेब देशमुख, निखील पाटील, जयदेव बर्वे, महादेव मुळे, बालाजी पाराशर, सचिन सूर्यवंशी, लिंबराज पवार, सहदेव मस्के, अविनाश देशमुख, गोरोबा लोखंडे, हमीद शेख, अशोक पाटील, हणमंत पवार, अशोक देडे, शिवाजी कांबळे, रमेश देशमुख, नाना जाधव, वाल्मिक माडे, संजय बिराजदार, किरण बनसोडे, श्रीकांत बैले, सुमित खंडागळे, विनोद वाकडे, सतीश हलवाई, जयप्रकाश दगडे, राम जेवरे, हरी तुगावकर, राजू पाटील, अरुण समुद्रे, शहाजी पवार, दीपरत्न निलंगेकर, एजाज शेख, संजय सगरे, विनोद चव्हाण, यशवंत पवार, हरिराम कुलकर्णी, संजय पाटील, आनंद दणके, रवीकिरण सूर्यवंशी, अंकलकोटे, श्रीकांत पाटील, संतोष बिराजदार, अॅड. फारूक शेख, मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, संचालक गणपतराव बाजुळगे, डॉ. बाबासाहेब गायकवाड, मांजरा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संचालक श्रीशैल्य उटगे, सदाशिव कदम, डॉ. हणमंत किनीकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. सईताई गोरे, उदयसिंह देशमुख, पी.सी. पाटील, पत्रकार संजय सगरे, ओमकार सोनटक्के, अमरसिंह भोसले, स्वयंप्रभा पाटील, किरण बाभळसुरे, प्रकाश मिरगे, सतीश शिंदे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व संलग्न संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी जागवल्या. या सभेचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले.
















