सतीश टोणगे : कळंब
कोणत्याही निवडणुकीत उभे राहण्या साठी आता शपथ पत्रात संपत्ती जाहीर करावी लागणार आहे. त्या मुळे गोर गरीब, सर्वसामान्यांची कामे करत करत कुणी किती संपत्ती जमा केली हे जनतेच्या लक्षात येवू लागले आहे. गरिबांचा वाली, विकास पुरुष, आधार स्तंभ,अशी स्वय घोषित बिरुदे लावून समाजात मिरवना-यांची संख्या मोठी झाली आहे.
राज्यात लोकसभेच्या निवडणुकीमुळे कोणत्या उमेदवारा जवळ किती सोने, चांदी, गाड्या , जमिनी, बंगले, रोकड रक्कम आहे ते बाहेर येवू लागले आहे.संपत्ती आणि कमाई यांचा ताळमेळ लागत नसल्याने आता ही मंडळी चौकशीच्या फे-यात अडकु नये म्हणून भा ज प त जावू लागल्याची कुजबुज होऊ लागली आहे.तुमच्या एवढ्या संपत्ती चा आम्हाला काय उपयोग, असे मतदार टोमणे मारत आहेत.
धाराशिव जिल्हा म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील असे समीकरण राज्यात लागू झाली होते.ते शरद पवार यांचे खास शिलेदार होते.राज्यात त्यांचा दबदबा होता.आता त्यांचे पुत्र आ. राणा पाटील हे राजकारणात सक्रिय असून, ते भाजप वाशी झाले आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ.अर्चना ताई पाटील ‘घड्याळ’ बांधून लढत आहेत. शपथ पत्रा मुळे त्यांची संपत्ती बाहेर आली आहे. ताई कडे तीन किलो सोने आहे. एवढेच नाही तर आणखीन बरेच काही आहे. एकीकडे एका महिले कडे एवढी मोठी संपत्ती तर दुसरी कडे मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी मंगळसूत्र मोडण्याची, घाण ठेवणारी महीला या राज्यात आहेत. कोणत्याही कार्यक्रमात महिलांना साड्या वाटून त्याचा गवगवा करणा-या राजकारणी महिलांनी सोन्याचे दागिनेचे वाटप करावे, अशी खुली चर्चा महिला करू लागल्या आहेत.
निवडून आल्यानंतर ही नेते मंडळी, ‘कोटी च्या कोटी उड्डाणे’ घेवू लागली आहेत. या मतदार संघात सोनेरी झळाळी लाभलेल्या या उमेदवारांची संपत्तीचा मुद्दा उन्हाप्रमाने तापू लागला आहे.
मुलीच्या लग्नात सोने देता आले नाही , म्हणून लग्न मोडण्याची अनेक उदाहरणे आहेत.कर्ज बाजारी झालेल्या शेकडो शेतक-याने आत्महत्या केल्या आहेत. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आह. या कडे कुणाचे लक्ष नाही. एवढ्या संपत्ती मधून खारीचा वाटा असा कुटुंबाला दिल्यास नक्कीच पुण्य मिळेल……पण मतदान होई पर्यंतच गोर गरीब ना विचारले जाते. अर्चना ताई आपण बी थोडस लक्ष द्या की….अशी विनंती महीला वर्ग करत आहेत. तर एवढी मोठी संपत्ती समजल्यावर जुन्या जाणत्या बायाच्या कपाळावर आठ्या पडल्या की…..सोन्याचा चमचा घेवून जन्माला आली…यालाच म्हणतात बघा अशी कुजबुज मतदार संघात होत आहे.