32.6 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeनांदेडनांदेडच्या विकासासाठी खा. चिखलीकरांना विजयी करा

नांदेडच्या विकासासाठी खा. चिखलीकरांना विजयी करा

केंद्रीय मंत्री गडकरी यांचे देगलूर, मुखेड येथे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी
देशातील ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम व्हावा, शेतकरी सुखी व्हावा, हे नरेंद्र मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे, मोदी सरकारला ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे, शेतक-यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून द्यायचा आहे, ग्रामीण भागात उद्योग आणून शेतक-यांच्या मुलांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे, नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मी १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यापुढेही देगलूर, मुखेडसह संपुर्ण नांदेड जिल्ह्याच्या विकासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी देगलूर आणि मुखेड येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार अजित गोपखेडे, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,गंगाधर जोशी, व्यंकटराव पाटील गोजेगावकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,अतिरिक्त ऊस आणि साखर यांपासून इथेनॉल निर्मिती हा अतिरिक्त साठ्याला सामोरे जाण्यासाठी एक योग्य मार्ग आहे. यामुळे साखरेची देशांतर्गत किंमत स्थिर राहण्यात मदत होईल तसेच साखर कारखान्यांना साठवणुकीच्या समस्येतून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. इथेनॉलच्या माध्यमातून देशातील शेतकरी आज इंधन निर्मिती करीत आहे.

देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून देगलूर- हैद्रसबादसह अन्य मोठ्या शहरांचे अंतर कमी करण्यासाठी चौपदरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे. मोदी सरकार हे विकासाला गती देणारे आहे. काँग्रेस सरकारने ग्रामीण भागातील रस्ते ,पाणी, वीज ,शिक्षण सुविधा याकडे कायमचे दुर्लक्ष केले होते, परंतु ही उणीव मोदी सरकारने भरून काढली.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलेल्या उदगीर- रावी -देगलूर -आदमपूर सगरोळी या मार्गाच्या कामासाठी ७०० कोटी रुपये मंजूर झाले असून हे कामही प्रगतीपथावर आहे असे मंत्री गडकरी म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार प्रसादराव पाटील यांना प्रचंड मताधिक्य द्या असे आवाहन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. अजित गोपछडे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR