40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्स बनला टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ

मुंबई इंडियन्स बनला टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दमदार विजय मिळवत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १७ व्या हंगामात आपले विजयाचे खाते उघडले. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून २३४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला आठ गडी गमावून केवळ २०५ धावा करता आल्या. परिणामी मुंबईने २९ धावांनी विजय मिळवत टी -२० क्रिकेट मध्ये सर्वाधिक १५० सामने जिंकून इतिहास रचला.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईची धावसंख्या १७ षटकांत ४ बाद १६७ धावा होती , त्यावेळी मुंबईचा संघ जवळपास २००-२१०धावांपर्यंत मजल मारेल असे वाटत होते. मात्र, डेथ ओव्हर्समध्ये टीम डेव्हिड ४५ धावा आणि रोमॅरियो शेफर्ड ३९ धावांची तुफान फटकेबाजी केली. या दोघांच्या फलंदाजीमुळे मुंबईला २३४ एवढी मोठी धावसंख्या गाठता आली. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर मुंबईने शेवटच्या पाच षटकांत ९६ धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सला आठ गडी गमावून केवळ २०५ धावा करता आल्या.

टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
मुंबई इंडियन्स – १५०
चेन्नई सुपर किंग्ज – १४८
भारतीय संघ – १४४
लँकेशायर – १४३
नॉटिंगहॅमशायर – १४३

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR