40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोणाचे काय...अन ्

कोणाचे काय…अन ्

अमरावती : नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी बळवंत वानखेडे आणि दिनेश बूब यांच्यावर जोरदार टीका केली. अमरावतीत तिरंगी लढत बघायला मिळत आहे. दर्यापूर मतदार संघाच्या आमदाराने दर्यापूरात कोणताच दिवा लावलेला नाही. कधीही विधानसभेत कोणताही प्रश्न विचारला नाही. अधिका-यांशी चर्चा केली नाही, असा उमेदवार लोकसभेत निवडून गेल्यास जिल्हा २५ वर्षे मागे जाईल. जिल्ह्याचा कोणताही विकास होणार नाही अशी टीका काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यावर रवी राणा यांनी केली.

बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे बारा वाजता झोपेतून उठतात. ग्लासला ग्लास लावून त्यांची सुरुवात होते. रात्री जुव्वा खेळत असतात. दिनेश बूब यांना मत देणे म्हणजे बळवंत वानखडे सारख्या निष्क्रिय व्यक्तीला लोकसभेत पाठवणे होईल अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे व प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यावर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR