38.5 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeराष्ट्रीयकार झाडावर आदळली; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

कार झाडावर आदळली; दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू

रांची : झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात शनिवारी (१८ नोव्हेंबर) झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोन मुलांसह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. विवाह मिरवणुकीसाठी आलेल्या एसयूव्ही कारचे वेगामुळे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली, या अपघातात गाडीत बसलेल्या १० जणांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी आहेत. शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास मोफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील बागमारा येथे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची पुष्टी केली आहे. अपघाताबाबत माहिती देताना गिरिडीह उप ब्लॉक पोलीस अधिकारी अनिल सिंह यांनी सांगितले की, कारमध्ये प्रवास करणारे लोक लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आले होते. बिरणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थोरिया गावातून ही मिरवणूक आल्याचे त्यांनी सांगितले. येथून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या तिकोडीह गावात एका लग्न समारंभात सहभागी होऊन या लोकांचे वाहन परतत असताना वाटेत नियंत्रण सुटले आणि झाडावर आदळले.

एसडीपीओ यांनी सांगितले की, गाडी चालवताना चालकाला झोप लागली असावी, त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR