पालम : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी जिल्हा हा अत्यंत मागास आहे. या तुलनेत इतर जिल्हे आजही विकासाच्या बाबत खूप अग्रेसर आहेत. या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात सांगायचे झाल्यास जिल्ह्यासह पालम तालुक्यातील अनेक विकासाच्या गोष्टी आज लगेच होणे अपेक्षित आहे.
या तालुक्यातील सूतगिरणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. यासह तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल होणे अपेक्षित आहे. शासकीय कार्यालय, तालुक्यातील रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या समस्या यासंदर्भात तालुक्याचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. याच प्रश्नाची जाण असणा-या नेत्यांनी येणा-या काळात लक्ष देणे अपेक्षित असल्याचे मत युवक शंतनु आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.