कंधार : तालुक्यातील कळकावाडी येथील नवविवाहित पती-पत्नीने अवघ्या दोनच महिन्यात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना २३ रोजी रात्री शेतामधील घरात घडली. या घटनेमुळे कळकावाडी परिसरात खळबळ उडाली आहे. कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे व पत्नी कोमल नामदेव केंद्रे यांनी स्वत:चे शेतातील घराचे लोखंडी एॅगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.२३ एप्रिल रोजी रात्रीचे सुमारास घडली. ही बाब कंधार पोलीस स्टेशनला कळताच कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार गित्ते, पोकॉ. जुन्ने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा करून दोन्ही प्रेत कंधार ग्रामीण रुग्णालय येथे शेवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.
आत्महत्याग्रस्त नवदाम्पत्याचा विवाह दोन महिन्यापूर्वी म्हणजेच दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या आनंदाने कळकावाडी येथे सोहळा पार पडला होता, हे विशेष. मयताच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्याग्रस्त नामदेव केंद्रे यांचे वडील उद्धव मारुती केंद्रे राहणार कळकावाडी यांनी दिलेल्या फियार्दीवरून कंधार पोलीस स्टेशन मध्ये सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे दाखल करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे हे करत आहेत.