लातूर : वाढलेली बेरोजगारी, वाढत्या महागाईमुळे महिलांना घर चालवणे अवघड झाले असून मोठे आर्थिक संकट सर्व सामान्यांवर कोसळले आहे. सरकार मात्र मुंग गिळून बसल्यागत दिसत असल्याचा आरोप टवेन्टिवन अॅग्रोच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांनी शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी कासारगाव येथील भंडे यांच्या निवासस्थानी भेटी दरम्यान केला.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या निमित्ताने सुसंवाद बैठकीदरम्यान सौ. देशमुख यांनी उपस्थितांना काँग्रेसच्या जाहिरनाम्याची माहिती दिली. यावेळी उपस्थितांमध्ये सौ. स्मिता खनापुरे, संगीता मोळवणे, सपना किसवे, सोनाली थोरमोटे आदी होते. यावेळी देशमुख यांनी आवाहन केले की सर्वसामान्यांच्या न्यायासाठी डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. दरम्यान या भेटीप्रसंगी लिज्जत पापडच्या संचालिका शिला वाघमारे, सपना किसवे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.