29.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याशाहू छत्रपती यांचा विजय निश्चित, ‘एमआयएम’चा प्रश्नच नाही : इंडिया आघाडी

शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित, ‘एमआयएम’चा प्रश्नच नाही : इंडिया आघाडी

कोल्हापूर : या मतदार संघामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्री शाहू छत्रपती महाराज उभे आहेत. त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. अशातच ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी शाहू छत्रपती यांना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र एमआयएम सारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्यानेच असे प्रकार विरोधक करत आहेत. मात्र अशा प्रचाराला कोल्हापूरची सुज्ञ जनता फसणार नाही, असे पत्रक इंडिया आघाडी व महाविकास आघाडी तर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

खा. इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले की, मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यास सांगितले आहे. त्यांनी मला फोन केला नाही. त्यांनी माझ्याकडे समर्थन मागितलेले नाही. परंतु समाजातील त्यांचे स्थान काय आहे? हे आम्हाला माहित आहे. म्हणूनच मी ओवेसींना सांगितले की, शाहू छत्रपती यांच्यासारख्या चांगल्या उमेदवारांना मदत करण्याची आपली भूमिका असली पाहिजे. म्हणून आम्ही शाहू छत्रपतींना मागणी केली नसतानाही स्वत:हून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR