लातूर : प्रतिनिधी
देशातील सामान्य माणसाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी, समाजातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी, महागाई भरमसाठ वाढली ती कमी करण्यासाठी, उच्चशिक्षण घेऊन देखील बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार देण्यासाठी, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, ती सुधारण्यासाठी, मनरेगा अंतर्गत हाताला काम मिळावे यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा मतदारांशी परिचय व्हावा यासाठी गेल्या कांही दिवसापासून लातुर लोकसभा मतदारसंघात सुसंवाद बैठका घेतल्या जात आहेत. लातुर विधानसभा मतदार संघातील वासनगाव येथे दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी रमेश थोरमोटे पाटील यांच्या निवासस्थानी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला वासनगावसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते.
पूढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, वासनगाव हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या -हदयाजवळील हे गाव असून या ठिकाणी आल्यानंतर आपल्या घरी असल्याचे वाटते असे सांगीतले. यावेळी पूढे बोलतांना म्हणाले, लातुर लोकसभेचे तत्कालीन खासदार मतदार संघात सोडा, सभागृहात तरी कधी आले की नाही? कधी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले की नाही? अशी शंकाच आहे. सद्या आपल्याला सामान्य माणसाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी, भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी, शेतमालाला भाव देण्यासाठी, महागाई भरमसाठ वाढली ती कमी करण्यासाठी, उच्चशिक्षण घेऊन देखील बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार देण्यासाठी, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, ती सुधारण्यासाठी, मनरेगा अंतर्गत हाताला काम मिळावे यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले.
प्रस्ताविक करताना सोनाली थोरमोटे पाटील यांनी केले. आपण सर्वांनी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले. यावेळी निरीक्षक सर्जेराव मोरे, तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, तात्यासाहेब देशमुख, श्रीकृष्ण पाटील, रमेश थोरमोटे पाटील, सतीश कानडे, लक्ष्मण मारडकर, हरिभाऊ घोगरे, भूजंग जाधव, भागवत साळुंके, नामदेव मारडकर, विठ्ठल डुरे, रघुनाथ मस्के, विठ्ठल पाटील, रावसाहेब जाधव, सुखदेव पाटील यांच्यासह वासनगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी गोविंद डूरे यांनी आभार मानले.