किल्लारी : वार्ताहर
किल्लारी येथील बाजारपेठेत सध्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्यामुळे व व्यापा-यांची फसवनुक होत आसल्यामुळे हाचिंंतेचा विषय होत असून याबाबत विभागाने लक्ष देऊन घालुन या टोळीस पकडावे अशी मागणी व्यापा-यांतून केली जात आहे.
बाजारपेठेतील बनावट नोटा या व्यापा-यात चर्चेचा विषय झाला आहे. दोन दिवसांपूर्वी या परीसरात वादळी पाऊस झाला त्यामुळे लाईट बंद झाली. याचा फायदा या टोळीने घेतला व येथील एका दुकानात आईसक्रीम, कोल्ड्रीक वगेरे घेऊन त्या बनावट नोट देऊन वापस पैसे ही घेऊन गेले म्हणजे शुन्य कागद देऊन सामानही घेतले व ओरीजनल पैसेही घेऊन गेले..अशा अनेक व्यापा-याची फसवुनक झाली आहे मात्र ते नसतेच दुसरेच झंझट मागे लागेल म्हणुन गेलेले सामान पैसे गेले तर गेले कोण त्याच्या मागे लागा धंदा पाणी सोडून पोलीसाची झंझाट मागे कशाला लावून घ्या अशी चर्चा व्यापा-याात दिसून येत आहे. संबधीतानी या बनावट नोटाच्या टोळीला तात्काळ जेरबंद करावे आशी मागणी व्यापा-यांतून होत आहे.