29.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरविकासाच्या नावे भकास करण्याचे काम

विकासाच्या नावे भकास करण्याचे काम

अहमदपूर  : प्रतिनिधी
भाजपाकडून विकासाच्या नावावर जनतेला भकास करण्याचे काम करण्यात आल्याचे प्रतिपादन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले. तालुक्यातील ग्रामपंचायत तळेगाव, बेलूर, आजनी, सलगरा, मेथी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  विनायकराव पाटील  म्हणाले की.  स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास आठवला तर आपल्याकडे इंग्रजांचे राज्य  होते. निजामशाही असेल वेगवेगळ्या लोकांनी आपल्यावर राज्य केले. त्याच पद्धतीने भाजपा पक्ष करीत आहे. विकास केला म्हणत आपणाला भकास करायचे काम करत आहे. भाजपा सरकार हे उद्योगपतीचे सरकार आहे.त्यांना शेतकरी, बेरोजगार, सुशिक्षीत तरुणांनांची अजिबात काळजी नाही. खताचे, औषधांचे भाव वाढविले, पेट्रोल -डिझेल, गॅसचे भाव वाढविले पण शेतक-यांच्या मालाचे भाव वाढू दिले नाहीत.
शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे म्हणून भारतीय जनता पक्षा विरुद्ध मतदार-जनता अशी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांनी भाजपा सरकारवर जोरदार  टीका केली.
यावेळी माजी सभापती आर.डी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सोमेश्वर भाऊ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस साजिद सय्यद, काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम,  कृषी उत्पन्न संचालक संतोष रोडगे,कमलाकर पाटील ,राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष  रामभाऊ बेल्लाळे, विनायक पाटील माकणीकर, सचिव शिवराज पाटील, मा.पंचायत समिती सदस्य कमलाकर पाटील, राम नरवटे, शिवसेना कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, पद्माकर पेंढारकर, बालाजी काळे, दामोदर घोरपडे, बालाजी कदम, ओम गुंडरे आदी  उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR