आंतरवाली सराटी : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकसभेत कुठेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठींबा नाही ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, असे देखील जरांगेंनी स्पष्ट केले.
कुठेही प्रचाराला जाणार, लोकांचे उलटे आहे आपले उलट आहे. लोक मतं मागायला जातात पण आपल्याकडे आधी मतं आहेत. मराठ्यांची परिस्थिती आता पहिल्यासारखी राहीली नाही. कोणताही उमेदवार देणार नाही, पाठिंबा देणार नाही. आता मराठा समाजाने निर्णय घ्यावा, असे मनोज जरांगे म्हणाले.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, वसंत मोरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनोज जरांगेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे नवीन आघाडी करणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता जरांगे राजकारणापासून दूर राहणार हे स्पष्ट झाले आहे.